‘यादवां’पासून ‘दिवाणजी’पर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही – सतेज पाटील

 

कोल्हापूर | आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर लावलेल्या आरोपांना सतेज पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. २००३ पासून डी.वाय.पाटील समूहाने सुमारे साडेअकरा कोटींचा घरफाळा भरला आहे. थकबाकी असती, तर विधान परिषद निवडणुकीत छाननीतच आपला अर्ज उडाला असता. चंद्रकांत पाटील यांनी माहिती घेण्याचे सौजन्य दाखवायला हवे होते.

मात्र, त्यांची अपरिपक्वताच पुन्हा एकदा दिसून आली. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रयत्न होत असेल, तर ‘यादवां’पासून ‘दिवाणजी’पर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता 30 कोटी घरफाळा थकविल्याचा आरोप केला. यासंदर्भात सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला.

सतेज पाटील म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नीचे दुःख दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मोठे मन दाखवायला पाहिजे होते; पण त्यांनी स्वाभिमानी कोल्हापूरकरांवर ही निवडणूक लादली आहे. शिवाय विकासकामांऐवजी वैयक्तिक टीका करण्यावरच त्यांचा जोर आहे.

Team Global News Marathi: