‘या’ कारणामुळे मुनमुन दास सोडणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ?

 

तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. या मालिकेसंदर्भात चाहत्यांना सतत वाईट बातम्या ऐकायला मिळत आहेत. आधी दयाबेन नंतर शैलेश लोढा आणि आता मालिकेमधील आणखी एक महत्वाचं पात्र साकारणारी अभिनेत्री बबिता जी अर्थात मुनमुन दास भूमिका सोडणार आहे.

माहितीनुसार, मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला लवकरच सोडणार आहे.मुनमुन दत्ता हिला ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनसाठी संपर्क साधण्यात आला आहे. जर ती यामध्ये जाण्यास तयार झाली तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडू शकते. पण मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याचे कोणतेही विधान केलेले नाही.

चाहत्यांसाठी मजेशीर बाब आहे. जर अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये गेली तर तिला रिअॅलिटी शोमध्ये पाहणे चाहत्यांसाठी खूप वेगळा अनुभव असेल. अभिनेत्री ‘बिग बॉस 15’ मध्ये पाहुणी म्हणून घरात गेली होती. यावेळी या अभिनेत्रीचे खूप कौतुक झाले होते. अशा परिस्थितीत जर मुनमुन या शोचा भाग बनली तर हा शो धमाका करणार असेच दिसून येते.

Team Global News Marathi: