नवी दिल्ली | राज्यसभेत बुधवारी झालेल्या गोंधळावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आता चांगलेच भडकले आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता ही कसली मर्दानगी आहे?, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभेच्या गोंधळामुळे विरोधी खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं.
तसं भारत-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे’, असा हल्ला राऊत यांनी मोदी सरकारवर चढवला होता.
is this our parliamentary Democracy?
Marshall law in Temple of Democracy..
राज्यसभा…. pic.twitter.com/52oKWZ6swQ— Sanjay Raut (@rautsanjay61) August 12, 2021