हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली – चंद्रकांत पाटील

 

भाजप नेता आणि माजी खासदार किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाई फेकल्याची घटना घडली आहे. हे कृत्य खासदारं भावना गवळी यांच्या शिवसैनिकांनीच केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?, हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली, आता सुरू झाली हिटलरशाही. भावना गवळींचा १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशिमला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला, हा त्याचाच पुरावा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा! असे ट्विट त्यांनी केले होते.

Team Global News Marathi: