बायकोच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्याची आत्महत्या

बॉलीवूडमध्ये सध्या आत्महत्येचा सत्रच सुरु झाले आहे. त्यात आता आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.अल्ट बालाजीसोबत काम केलेला, एमएस धोनी, केसरी यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहर यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या अभिनेत्यानं आपल्या फेसबुकवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे.

मृत्यूपूर्वी संदीप नाहर याने लिहिलेली भावनिक पोस्ट
अभिनेता संदीप नाहरने मृत्यूपूर्वी फेसबुकवरील पोस्टमध्ये आता जगण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. “जीवनात अनेक सुख-दु:ख पाहिली. प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी ज्या अवस्थेतून जात आहे ते सहन करण्यापलीकडे आहे. मला माहिती आहे

आत्महत्या करणं हे कायरतेचं लक्षण आहे. मलाही जगायचं होतं. पण अशा जगण्याला काय अर्थ जिथे शांतता आणि स्वाभिमान नाही. माझी बायको कांचन शर्मा आणि तिची आई वुनू शर्मा यांनी ना मला समजून घेतलं ना समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझी बायको शिघ्रकोपी आहे. तिचं व्यक्तीमत्व आणि माझं व्यक्तीमत्व वेगळं आहे, जे मॅच होऊ शकत नाही”, अशी पोस्ट अभिनेता संदीपने केली होती.

रोज सकाळ संध्याकाळ भांडण. आता माझ्यात ऐकण्याची शक्ती नाही. त्यात कांचनची काही चूक नाही. तिचा स्वभावच तसा आहे. तिला सर्वकाही नॉर्मल वाटतं, पण माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नाही. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी खूप वाईट वेळ पाहिली पण कधी अडलो नाही. डबिंग केली. जिम ट्रेनर राहिलो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो. स्ट्रगल होतं पण समाधान होतं.

आज मी खूप मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदललं आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटतं की सर्वकाही ठिक सुरु आहे. कारण ते फक्त आमच्या सोशल पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळं खोटं आहे. जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळं खोटं आहे”, असंही संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Team Global News Marathi: