“शरद पवारांनी नेमकं कशासाठी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं? भाजपने उपस्थित केला सवाल !

 

वरळी येथे बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पासाठी रविवारी आयोजित उदघाटन सभारंभात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले होते. आता याच मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं, पण कशासाठी कौतुक? कारण गेले दिड वर्ष भाषणातले शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन व त्यांचं ड्रायव्हिंग या हेच तर जनता पहातेय. ते जे प्रकल्प सुरू करत आहेत ते सुरू केले देवेंद्र फडणवीस यांनी, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.

तसेच ते दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात की, लट मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सांगायचीच तर, कोरोनातील अपयश, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश, ओबीसी आरक्षण अपयश, पूरग्रस्तांना मदतीत अपयश, शेतकऱ्याना मदतीत अपयश, ही अपयशाची यादी वाढू शकते, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

 

 

Team Global News Marathi: