मलिकांनी घरावर पाळत ठेवल्याची तक्रार ट्वीट करून का दिली – अतुल भातखळकर

 

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून दिवसांपासून गाडीत बसलेले हे लोक माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत’, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत केला आहे. फक्त एवढेच नाही तर या संशयितांचे फोटो देखील मलिकांनी ट्विट केले आहेत.

ट्विटमध्ये मलिक म्हणाले आहेत की,’या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.’ मात्र आता या ट्वीटवरूनच भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मलिक यांना सवाल करत टोला लगावला आहे.

नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्विट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही का? असा खोचक सवाल करणारे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी नवाब मलिकांना टोला लगावला आहे.
मलिक यांनी काही फोटो ट्विट करून शेअर केले आहे.

Team Global News Marathi: