“ज्यांना उद्योग नाही ते टीका करत असतात” अजित पवारांनी फटकारले

 

प्रसार मध्यमांशी संवाद साधत असतांना भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच टीका करताना राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी, असे वर्णनही केले. दरम्यान, यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी या टीकेसंदर्भात विचहरले असताना त्यांनी जोरदार टोला लगावला होता.

पवार म्हणाले की, “ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचं. पुन्हा तुम्ही त्यांच्याकडे जायचं, त्याला तुमचं उत्तर काय असं विचारायचं. यातून तुम्ही काय साधणार आहात? आणि मी काय साधणार आहे? राज्यातील जनता काय साधणार आहे? याचाही विचार करा ना, असे अजित पवार मीडियाशी बोलताना म्हणाले.

अजित पवार रत्नागिरीच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी जिल्हानियोजनाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. “यावेळी सुजय विखे पाटील यांच्या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सुजय विखेंना फटकारलं. ज्यांनी केलेल्या स्टेटमेंटला गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशा स्टेटमेंटबद्दल आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या स्टेमेंटला फार काही महत्त्व द्यायची गरज नाहीअशा शब्दात अजित पवारांनी विखेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले.

Team Global News Marathi: