औरंगाबादचं नाव बदलण्याने काय साध्य होणार ? खासदार कोल्हेचा शिवसेनेला टोला
औरंगाबादचं संभाजी नगर नामकरण झाले पाहिजे अशी मागील ३० वर्षापासूनची शिवसेना पक्षाची मागणी आहे. त्यात आता मनसेने सुद्धा हीच मागणी धरून ठेवली आहे. याच मुद्यावर शिवसेना आणि भाजपाने दोन वेळा औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये भगवा फडकावला होता. मात्र औरंगाबादचे नामकरण आहि झाले नाही आता हाच मुद्धा पकडत राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. औरंगाबादचं नाव बदलण्याने काय साध्य होणार ? असा सवाल नाव न घेता शिवसेनेला विचारला आहे.
औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायला हवा. आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं, नाव बदलण्याने काय साध्य होणार आहे? अस्मितेच्या प्रश्नाने मराठवाड्याचे प्रश्न थांबणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत अशी भूमिका खासदार कोल्हे यांनी मांडलेली आहे.