गल्लीबोळात यात्रा काढून काय उपयोग, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

गल्लीबोळात यात्रा काढून काय उपयोग, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

ग्लोबल न्यूज: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही आणि गल्लीबोळात यात्रा काढून आमचा कायदा कसा चांगला आहे ? हे सांगून काय उपयोग असा सवाल जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

किसान आत्मनिर्भर यात्रेच्या निमित्ताने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे इस्लामपूर येथे आले होते. यावेळी या दोघांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकरी कायदा कसा आहे याचे महत्व शेतकऱ्यांना आणि आपल्याच कार्यकर्त्यांना पटवून दिले होते. त्याला आता मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपातील लोक म्हणतायेत की राष्ट्रवादी काँग्रेसला मार्केट कमिटी वाचवायची आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, आम्हाला मार्केट कमीटी नाही तर शेतकर्यांचे हक्क अबाधित ठेवायचे आहे. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी हा आमचा लढा आहे असे मंत्री जयंत पाटील यांनी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: