राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना याच मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मानती अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मात्र तरीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर येत्या १६ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी काढण्यात येणारा मोर्चा हा दिल्लीत काढायला हवा. मराठा आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. मात्र आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीवरुन संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. त्यावर आता ते पुढील निर्णय घेतील, असे राऊतांनी सांगितले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आगामी काळात, कोणत्या दिशेने जायच आहे, त्यानुसार काम सुरू आहे संघटनेला गती मिळण्यासाठी हा दौरा आहे. उत्तर महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं.
आमचे सर्व लोक चांगलं काम करतात.आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतंय.पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं. आमचे सर्व लोक चांगलं काम करतात. आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतं आहे असे राऊत यांनी बोलुन दाखविले होते.