वाझे पासून मातोश्री अडचणीत, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा – आमदार रवी राणा

अंबानी प्रकरणी NIA ने सचिन वाझे याला अटक केली होती. या अटकेनंतर अनेक खळबळजन खुलासे झालेले समोर आले होते. त्यात या प्रकरणी विरोधकांनी महाविकास आघाडी आणि वाझे यांच्याशी संबंध असलेल्या शिवसेनेला टार्गेट केले होते. त्यात आता आमदार रवी राणा यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे वाझे यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला. या दाव्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे आघाडी सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

आता रवी राणा यांनी केलेल्या दाव्याला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी पत्राच्या माद्यमातून केली होती.

Team Global News Marathi: