राष्टवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा जयंतराव पाटील परभणी मराठवाड्याचा दौरा केला. पक्ष कार्यात स्वःताला गुंतून हारतुरे घेत बसले पण अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या नुकसानीची पाहणी तर सोडा साध त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रु देखिल पाहिले का नाही असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला .
प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागच्या एक महिन्यापासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला . पंचवीस लाख हेक्टर शेती जमिनीचे नुकसान आणि खरीप पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल.जीवित हानी मोठ्या प्रमाणावर , मुके जनावरे वाहून गेली , विभागातील शेतकरी भयानक संकटात सापडला असून सरकार मदत करायला तयारच नाही ? मदतीच सोडा, राज्याचे जलसंपदा मंत्री सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंतराव पाटील परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले . त्यांनी संघटनात्मक कामाचा आढावा घेत हारतुरे घेतले, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहण्यासाठी त्यांना वेळ का मिळाला नाही? असा सवाल कुलकर्णी यांनी केला . वास्तविक पाहता शेतकरी एवढ्या संकटात आहे त्यांची मानसिकता दुःखी आहे .
सत्ताधारी पक्षाची मंडळी त्यांच्या दुःखावर मिठ चोळतांना विभागात येऊन हार तुरे असा चंगळवाद का करतात? हेच कळत . जयंतराव पाटील हे स्वतः जल मंत्री आहेत मराठवाडा जलाशय झाला असताना त्यांच्याकडून जर खऱ्या अर्थाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी झाली असती तर लोकांनी स्वागत केल असत . मात्र कुठल्या तालुक्यात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या नाही नुकसान पाहणी केली नाही संवेदना ठेवून त्यांनी जर पाहणी केली असती तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता . पण राज्यातील महा विकास आघाडी सरकारच असंवेदनशील असून जयंतराव पाटील यांच्या भूमिकेतून पाहायला मिळालं .
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री औरंगाबादेत येऊन गेले त्यांनीही शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले नव्हते . वर्तमान परिस्थिती पाहता मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात संतापाची लाट पसरल्याच कुलकर्णी यांनी म्हटले असून अद्याप प्रशासकिय पंचनामे पूर्ण नाही ओला दुष्काळ जाहिर करणे एवढाच पर्याय शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे