मुंबई | ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रवक्रते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर अनके गंभीर आरोप लगावले होते. त्यातच रोज पत्रकार परिषद आणि ट्विटच्या माध्यमातून मलिक दररोज वानखेडे यांचयव्हर अनके गंभीर आरोप लगावताना दिसून आले होते.
आता पटीनं एकदा मलिक यांनी निशाणा साधला आहे समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केलं. नोकरीसाठी नाव बदलण्याचं काम केलं असा थेट आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर मलिक यांनी लगावला होता.
वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची योग्य पडताळणी व्हावी. वानखेडेंनी खोटेपणाने नोकरी मिळवली. सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले. यावेळी त्यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबावर कडाडून हल्ला चढवला.