नवी दिल्ली | मागील काही काळापासून टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या पालनमध्ये मोठ्या प्रमाणात वाद करून सर्व सामान्य नागरिकांना धक्का दिला आहे. एकीकडे कोरोनाची संकट गडद होत असताना दुसरीकडे प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ होत असुन सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसताना दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दरवाढीचा निर्णय कंपनीच्या नोव्हेंबरमध्ये केलेली दरवाढ आणि बाजारातील प्रतिक्रिया यावर अवलंबून असेल तर दुसरीकडे व्होडाफोन-आयडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर टक्कर यांनी सांगितले, की कंपनीने सुमारे एक महिन्याच्या सेवेसाठी ९९ रुपये किमान किंमत निश्चित केली आहे, जी ४जी नेटवर्क वापरणाऱ्यांसाठी खर्चिक नाही.
त्यामुळे २०२२ मध्ये या किमती किती वाढतात हे पाहावे लागेल. याआधी ज्यावेळी कंपनीने दरवाढ केली होती, त्याचा फटका कंपनीला बसला होता. कंपनीचे ग्राहक २६.९८ कोटींवरून २४.७२ कोटींवर आले आहेत. टॅरिफ वाढ असूनही, २०२०-२१ च्या त्याच तिमाहीत १२१ रुपयांच्या तुलनेत त्याचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल जवळपास ५ टक्क्यांनी घसरून ११५ रुपये झाला आहे.
कर्जात अडकलेल्या दूरसंचार ऑपरेटर व्होडाफोन-आयडियाचा गेल्या आठवड्यात डिसेंबर २०२१ मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ तोटा ७,२३०.९ कोटी रुपयांपर्यंत वाढला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला ४,५३२.१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.