फडणवीसांच्या विधानामुळे विठोबा माऊलीसुद्धा सावध झाली असेल; शिवसेना नेते संजय राऊत यांचा टोला

ग्लोबल न्यूज; फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांच अभिनंदन करू. सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय पण, त्यांनी पंढरपुरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण विठू-माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडीला आहे, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

 

 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीस यांनी विठोबा माऊलीला साकडं घातलं असेल तर विठोबा माऊली पाहील. पण आज जनता कोरोना संकटात सापडली आहे. या काळात सरकार पाडणं, सरकार घालवणं, सरकार अस्थिर करणं या सगळ्यातून विरोधकांनी बाहेर आलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

विरोधी पक्षाला अशी भाषणं करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणं केलेली आहेत, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी, त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी फडणवीस तसे भाषण करत असतील. या काळात सरकार पडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार हे, जेव्हा ते पाडतील तेव्हा त्यांचं अभिनंदन करू, असा टोला संजय राऊत यांनी वारंवार सरकार पाडण्याचं भाकीत करणाऱया विरोधकांना लगावला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: