विश्वास पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हणून अवघा महाराष्ट्र गेली १०५ वर्षणापासून ओळखत आहे. कागदपत्रे साक्ष देतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सीरियलसाठी वापरले इतकेच.” असे या पोस्टमध्ये विश्वास पाटील यांनी लिहिले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “यावर वाद करण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज घराघरात, मनामनात पोहचावे म्हणून काय काय प्रयत्न केलेत?” असे ते म्हणाले.
“मला वाटत नाही विश्वासराव असे म्हणाले असतील. मी स्वतः छत्रपती संभाजी महाराज आणि इतिहासाकडे आकर्षित झालो. त्याचे कारण विश्वास पाटील यांची छत्रपती संभाजी ही कादंबरी आहे. त्यांच्या संदर्भातील माझी गोड आठवण आहे. मी त्यांना स्वतः म्हणालो की, छत्रपती संभाजी राजेंवर लिहा कारण मला स्वतःला संभाजी राजेंची भूमिका करायची आहे. मी अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचे दैवत आहेत. असे आम्ही दोघे आहोत. मी त्यांच्याशी चर्चा केली आहे.” असे ते म्हणाले.
“विश्वासरावांना सांगण्याइतका मी मोठा नाही. आम्ही दोघे एकाच दिशेने चाललो आहोत आणि मला वाटते की, विश्वासराव यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची गरज नाही. गेली आठ नऊ वर्षे अनेक चॅनल अनेक कंपन्यांची उंबरठे झिजवले. छत्रपती संभाजी महाराजांवर मला मालिका करायची आहे आणि यालासुद्धा कोणी तयार नव्हते. आज जे कोणी या वादावर उर बडवून बोलत असतील त्या प्रत्येकाने सांगावे की, त्यांनी आत्तापर्यंत काय केले?” असेही ते म्हणाले.