केंद्रीय मटणरी आणि भाजपा नेते नारायण राणे यांची जण आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे तसेच राणे यांच्या बंगल्याच्या खाली राडा करणाऱ्या युवासेना सचिन वरुण सरदेसाई यांचा चांगलाच समाचार घेतला होता. तसेच थेट गंभीर इशारा देत पुन्हा एकदा घराजवळ आंदोलन करण्याचे धाडस दाखवण्याचा इशारा दिला होता.
राणे म्हणाले की, वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत आला तर माघारी जाणार नाही, असा थेट इशारा राणेंनी दिला. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे. वरुण सरदेसाई आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे यांच्या जुहू येथील घराबाहेर राडा घातला होता.
राणे पुढे म्हणाले की, आमच्या घरावर हल्ला करणारा मुख्यमंत्र्यांचा नातलग आहे, त्यामुळे त्याला अटक होत नाही. तो काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट ? कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढा त्याला दिला आहे, असे राणे म्हणाले. तसेच, वरुण सरदेसाइनं आंदोलनादरम्यान चांगलाच मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या आमच्या मुलांनी एव्हढा चोपला ना त्याला…आता परत आला तर परत नाही जाणार, असा इशाराच नारायण राणेंनी दिला.
जन आशिर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. #JanAshirwadYatra pic.twitter.com/g5WvZ429Eg
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 27, 2021