उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींची महाविकास आघाडीवर टीका, मात्र काही वेळातच ट्विट डिलीट

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर “देवाच्या काठीला आवाज नसतो” असं म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा शाधला आहे.

सोशल मीडियावरुन राजू शेट्टी यांनी आधी टिकेची पोस्ट केली मात्र काही वेळातचं ही पोस्ट डिलिट केली. राजू शेट्टी यांनी पोस्ट डिलिट का केली हे अद्याप कळू शकले नाही. काय होती पोस्ट? “महाविकास आघाडीच्या नेत्यांनो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीतील आड्याचा तुम्ही एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उद्ध्वस्त झाला! देवाच्या काठीला आवाज नसतो!!”, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: