सध्या राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी जोरदार आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता त्यापाठोपाठ आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येत्या ४० दिवसात मुख्यमंत्री पद सोडावे लागेल असा दावा त्यांनी केला आहे.
भोसले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधू हत्येचे पाप फेडावं लागेल. अनिल देशमुख यांना साधुंचे तळतळाट भोवले. आता पुढील ४० दिवसांत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.
आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे. ४० दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असे वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. आता या टीकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.