उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत, अन्यथा मेले असते, सेनेच्या आमदाराची काँग्रेससवर टीका

 

नागपूर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले तरी या तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर दिसून येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदाआघाडीमध्ये बिघाडी हात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता आता नागपूरमधील शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

रामटेकचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांची काँग्रेस नेत्यांवर टीका करताना जीभ घसरली आहे. आशिष जैस्वाल यांनी कॉंग्रेस नेत्यांवर जोरदार टिक केली आहे. ‘कॉंग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत झाले, नाहीतर हे मेले होते, एका एका व्यक्तीला पुरून उरणार आहे मी’ असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते आमदार जैस्वाल

काँग्रेस नेते मेले होते उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतल्यानंतर ते जिवंत झाले होते. यांच्या दोन्ही पार्टीमध्ये गळती लागली होती. तुम्ही लोकं मेलेला होता, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, सर्वजण सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात यायला तयार होते. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं त्यामुळं मेलेले लोकं जिवंत झाले आहेत. शिवसेनेच्या मतदारसंघात तुम्ही इतरांना मतदान करायला सांगता, एका एकाला मी पुरुन उरणार आहे, असा इशारा आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

Team Global News Marathi: