राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.. संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात टीका केली.. त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपावर केला.
मुख्यमंत्र्यांसोबत मविआ प्रमुख नेत्यामची बैठक झाली. आम्ही निवडणूक स्वीकारली आहे. आमचं बळ दाखवण्याची आम्हाला पून्हा एकदा संधी मिळाली आहे. आम्हाला बळ दाखवायचं नव्हतं, पण विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली आहे. याचा त्यांना पश्चाताप होणार आहे. मविआचे चारही उमेदवार निवडून येतील. कोणीही शहाणपणा करू नये. निवडणूकीत अजिबात घोडेबाजार होणार नाही. त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, आमचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
केंद्रीय एजन्सी दबाव टाकते पण आम्हीच जिंकणार आहोत. संजय पवार पहिल्या फेरीत निवडून येतील. या निकालानंतर विरोधकांना पश्चाताप होईल. अजिबात घोडेबाजार होणार नाही ज्याला करायचा त्यांनी घोडेबाजार करावा. विरोधकांनी राज्यसभा निवडणूक लादली. पूर्ण बहुमत आमच्याकडे आहे. त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात बोलायची गरज नाही. जे काय करायचे ते करा, शेवटी विजय आमचा आहे, असे संजय राऊत म्हणाले.