राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीत अनेकांचा पत्ता कात करण्यात येणार असून नव्या चेहऱ्यांना सर्वच पक्षांकडून संधी देण्यात येणार आहे. २० जूनला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. आता एक मोठी अपडेट हाती येत आहे. या हाती आलेल्या वृत्तानुसार अनेक बड्या आमदारांना यावेळी डच्चू देण्यात येणार आहे.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव या निवडणुकीतून सुरुवातीलाच बाजूला पडले आहे. यावेळी त्यांना विश्रांती दिली जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने त्यांना आधीच कळविले असून त्यांच्या जागी नव्या उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंचा खोचकपणे समाचार घेतला आहे.
आमदारकी साठी इतके दिवस सरकारवर तोंडसुख घेत होता, शेवटी सरसेनापती कडून विश्रांतीचा सल्ला मिळाला. याचा अर्थ तुमची तब्येत ठीक नाही . आता विश्रांती सह राजकीय संन्यास घ्यावा. पक्षाने तुमच्या जड बुद्धीला विश्रांतीचा सल्ला दिलाय. pic.twitter.com/jro7dk91Al
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 27, 2022
यंदा सदाभाऊ खोत यांना भाजपकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळणार नसल्याचे कळताच, अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. अमोल मिटकरी आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “आमदारकी साठी इतके दिवस सरकारवर तोंडसुख घेत होता, शेवटी सरसेनापती कडून विश्रांतीचा सल्ला मिळाला. याचा अर्थ तुमची तब्येत ठीक नाही. आता विश्रांती सह राजकीय संन्यास घ्यावा. पक्षाने तुमच्या जड बुद्धीला विश्रांतीचा सल्ला दिलाय.” अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ यांच्यावर टीका केली आहे.