मागच्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे अवकाळी पावसानं नागरिकांची चिंता वाढवली आहे. वातावरणातील बदलांमुळे हवामानावरही परिणाम दिसून येत आहे. हिंदी महासागरात उष्ण लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आलं आहे. याचा मान्सून आणि सागरी जीवनावर वाईट परिणाम होणार असल्याची भीती या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनानं हैराण करुन सोडलं आहे. तर दुसरीकडे ऐन थंडीतही अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सध्या नागरिक तर वैतागल्याचं पहायला मिळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे थंडीही चांगलीच वाढली आहे. या हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.
उत्तर प्रदेशातील अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. नोएडा ते बहराइच, श्रावस्ती, पिलीभीत, लखीमपूर खेरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली आहे. या पडणाऱ्याअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरीही हैराण झाले आहेत.