शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

 

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८३ वी सर्वसाधारण वार्षिक सभा काल कोल्हापुरात पार पडली या आशेत शेकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या वार्षिक सभेत ही घोषणा केली आहे.

बँकेची वार्षिक आढावा बैठक सोमवारी झाली. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. शून्य़ टक्क्याने कर्ज देणारी केडीसीसी ही ही पहिलीच बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. बँकेचे सभासद असलेल्या लाखो शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याची मागणी केली होती. यामुळे तीन लाखांची कर्ज मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली आहे.

संचालक मंडळाने प्रशासकाकडून सहा वर्षांपूर्वी बँकेची सूत्रे ताब्यात घेतली. तेव्हा बँक तोट्यात होती. गेल्या सहा वर्षांत १०३ कोटी रुपयांचा तोटा भरून काढत बँकेने १४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. सध्ये बँकेत ७१४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवी ९००० कोटी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. बँकेने १८.२२ कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

 

Team Global News Marathi: