केंद्रानं पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यात प्रजासत्ताक दिनी झालेल्या आंदोलनाला आता संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे.त्यात आता आंदोलनाचे प्रमुख टिकैत यांच्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीकेची झोड उठवली आहे.
भाजपचे श्रीरामचंद्रांचे काहीही देणे घेणे नाही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही, हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते… असे ट्विट त्यांनी केले आहे.