हे नामर्द सरकार आणि पोलीस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवतंय – चित्रा वाघ

संजय राठोड बलात्कारी असून, एका बलात्काऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्याभिचाराचं उदात्तीकरण सुरू आहे. पण, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं असे भाजपच्या महिला अध्यक्ष चित्राव वाघ यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात चित्रा वाघ यांनी काही सवाल उपस्थित केले आहे. त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोडांचे ४५ मिस्ड कॉल आले आहे. तो मोबाईल पोलिसांकडे आहे. त्याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही. याप्रकरणात आपल्याला फक्त अंदाज बांधायचे आहेत. कारण मराहाष्ट्रातील जनतेला काहीही माहिती नाही की, पूजा चव्हाण प्रकरणात नेमकं काय झालं आहे? अरुण राठोडने पूजाच्या मृत्यूच्या दिवशी १०० या नंबरवर कॉल करुन सर्व कबुली दिली होती. ‘यात माझा कुठलाही हात नाही. हे सर्व संजय राठोड यांच्यामुळे,’ असं त्याने सागितलं.

त्याचवेळी त्याला समोरच्या कंट्रोल रुमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने एक नंबर दिला. तो ९१४६८७०१०० हा नंबर, त्यांनी त्याला दिला. या नंबरवर कॉल करायला सांगितले या नंबरवर सकाळी ८.४० मिनिटांनी फोन गेला. मग अरुण राठोडने पुन्हा सर्व कबुली या क्रमांकावरील बोलणाऱ्या व्यक्तीला दिली. त्यानंतर अरुणला थांबवण्यात आले, त्यानंतर या क्रमांकावरुन तिसऱ्या व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर घेतले गेले. त्या कॉलवर पुन्हा एकदा सर्व सांगण्यात आली, आता ते दोन व्यक्ती कोण होते?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Team Global News Marathi: