कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आहे ज्यांची वेळ आली आहे त्यांनी ती टोचून घ्यावी असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. डीपीसीच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आतापर्यंतच्या आकडेवारी नुसार पावणेचार आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतली आहे.
कोरोना लसीकरनाच्या कार्यक्रमात आरोग्य विभागाने प्रथम प्राधान्य हे आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातील पावणेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. लसीकरणानंतर या आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत असल्याचे आरोग्यमंत्र्यानी सांगितले. तसेच लवकरच कोरोना लसीकरनाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचारी असलेल्या महसूल, पोलिस व नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, जेव्हा लोकप्रतिनिधींची वेळ येईल तेव्हा पहिली लस मी स्वत: घेईन असे त्यांनी बोलून दाखविले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी लागणारे आवश्यक डोस उपलब्ध होत आहे. सध्या इमर्जन्सी वापरासाठी दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता मिळालेली आहे असे त्यांनी बोलून दाखविले.