शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचं काम ठाकरे सरकारने केले आहे – प्रवीण दरेकर
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. राज्य सरकार फक्त घोषणा करतं, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
आज कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या बाबतीत सरकारने काही घोषणा केल्या होत्या. मात्र आजही कोकणी माणसाला मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीच्याबाबतीत आम्ही दौरे केले पाहणी केली. सरकारवर दबाव आणला. सरकारने मोठ्या थाटात १० हजार कोटींचे घोषणा केली. दिवाळीअगोदर २ हजार कोटी देऊ असं काही सांगितलं. आजही या क्षणाला अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा नाही. पाच पैसे त्याच्या खात्यात जमा झालेले नाही.
शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचं काम हे ठाकरे सरकार करत आहे. यांची करणी आणि कथनीमध्ये फरक आहे. दहा हजार कोटींपैकी २ हजार कोटी तर द्याच, परंतु दहा हजार कोटी अपुरे आहेत. तात्काळ यामध्ये वाढ करून १० हजार कोटींच वितरण होईल, याची शासनाने दक्षात घ्यावी.” असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.