संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज रुग्णसंख्या वाढीबरोबर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आतापर्यंत देशातील अनेक राज्यांत कोरोनाने आपले हात-पाय पसरायला सुरवात केली आहे.
आज देशातील पाच पेक्षा जास्त राज्यात मंगळवारी एकाच विक्रमी कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात कोरोना स्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.
त्यात महाराष्ट्रात कोरोना स्थिती अधिक भयावह बनत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढीमध्ये सोमवारी काही प्रमाणात घट झाल्यानंतर, मंगळवारी पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ६० हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात अयोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात मंगळवारी १८ हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुजरातमध्ये काल ६६९९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. तसेच मध्यप्रदेशात एकूण ८९९८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.