प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर जसे अत्याचार केले अगदी तसंच मुख्यमंत्री वागतायत – मनसे

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेणार आहे. मात्र यावर आता मनसेने ताशोरे ओढले आहे.

त्यात मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजवटीची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे. १८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहे, असे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आता लॉकडाऊन जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. यावरच मनसेने ताशोरे ओढले आहे. आता मनसेने मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: