मुंबई | मालाड पश्चिमेस असलेल्या मालवणी क्षेत्रात काल रात्री तीन मजल्याची रहिवाशी इमारत कोसळून पडल्यामुळे ११ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री व स्थानिक आमदार अस्लम शेख व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांचा दुर्लक्षपणा व बेजबाबदारपणा या दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. जुलै २०२० मध्ये येथे बांधकाम कोसळल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून मालवणी स्लम वसाहतीसाठी योजना करण्यात यावी अशी मागणी मुंबई उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांना ऑगस्ट २०२० च्या पत्राद्वारे केली होती. मात्र मंत्री महोदयांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुलेच आज ११ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ मध्ये सर्व प्रकल्प ग्रस्तांना आपले हक्काचे घर देण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी उपाय योजना करू या असे आवाहन त्यांनी केले. मालवणीच्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे असे देखिल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे. येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांनी झोपडपट्टीत २ ते ३ मजली पक्की घरे बांधली आहेत.
राज्य सरकारने मालवणीच्या अनधिकृत बांधकाम व स्लममध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरांच्या बाबतीत जातीने लक्ष घालून आणि त्यातून मालवणीसाठी एक वेगळा आराखडा तयार करुन या दिशेने गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे गोपाळ शेट्टी म्हणाले.