मुंबई: राज्यात वाढत्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच एक पर्याय असल्याचे मत त्यांनी मांडले होते. तसेच इतर देशांनी सुद्धा हाच पर्याय निवडला असल्याचे बोलून दाखविले होते.
आता याच मुद्द्यावरून भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सरकार स्वत:च्या चुकीची शिक्षा सामान्य जनतेला देत असल्याचे निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हणता ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ठाकरे सरकारचा पहिला उपाय पण लॉकडाऊन आणि शेवटचा उपाय पण लॅाकडॉऊन. आता म्हणतात कोरोनाची साखळी तोडायची आहे मग मधले काही महिने साखळी तुटली होती तेव्हा अंगठा का चोखत बसले?? स्वतःचं अपयश झाकण्याची शिक्षा सामान्य जनतेला का देताय?? असे त्यांनी म्हंटले आहे.
ठाकरे सरकारचा पहिला उपाय पण लॉकडाऊन आणि शेवटचा उपाय पण लॅाकडॉऊन. आता म्हणतात कोरोनाची साखळी तोडायची आहे मग मधले काही महिने साखळी तुटली होती तेव्हा अंगठा का चोखत बसले?? स्वतःचं अपयश झाकण्याची शिक्षा सामान्य जनतेला का देताय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 10, 2021