तेव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली, एकनाथ खडसेंनी सांगितल कारण

 

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु स्तन आता यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेकडून झालेल्या चुकीवर भाष्य केलं तसेच धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असंही खडसे म्हणाले.

शिंदे गट बाहेर पडल्यानंतर नैतिकता म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते असे देखील मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसंच, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला, मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल.

शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे. 16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं. असंही खडसे म्हणाले. तसंच, ‘राज्यसभेत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही मात्र विधानसभेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना हरविण्यात आलं ही खंत पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे जनतेच्या विकास कामासाठी जोपर्यंत माझे योगदान राहील तोपर्यंत माझा कुणीही पराभव करू शकत नाही’ अशी भावना पंकजा मुंडे यांच्या मनात होती. व त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं’ असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

Team Global News Marathi: