“.तर हे अंधभक्त बिळातच लपतील”, संजय राऊतांचा सामना अग्रलेखातून जोरदार टोला

 

मुंबई | आमच्या प्रेषितांचा अपमान करणाऱ्यांना उडविण्यासाठी आमच्या शरीरावर स्फोटके बांधू. या चुकीसाठी कोणतीही माफी, कोणतीही सुरक्षा व्यवस्था त्यांना वाचवू शकणार नाही,” अशी धमकी ‘अल कायदा’ने दिली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“निवडणुका जिंकणे याशिवाय त्यांना दुसरे काहीच सुचत नाही. उद्या ‘अल कायदा’ने त्यांची धमकी दुर्दैवाने खरी करून दाखवलीच तर तेथेही राजकारण करतील व त्या बॉम्बस्फोटांना हिंदू-मुसलमान असा रंग देऊन निवडणुकांत मते मागतील. राजकारण हे असे खालच्या पातळीवर गेले आहे. भाजपाचे हिंदुत्व हे इतरांच्या धर्मद्वेषावर आधारित आहे. भाजपाचे हिंदुत्व फाळणीस निमंत्रण देणारे व धार्मिक तणावातून राजकीय स्वार्थ साधणारे आहे.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपाचे हिंदुत्व लोकांना अंधभक्त बनवून दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला लावणारे आहे. या विषाच्या घोटाने देश तडफडला तरी त्यांना पर्वा नाही. मोहम्मद पैगंबरांच्या अपमान प्रकरणात भाजपाला हवा असलेला धार्मिक द्वेष व उन्माद दोन्ही निर्माण झाले. त्या उन्मादाचा उत्सव करायला अंधभक्त आहेतच, पण ‘अल कायदा’ची धमकी देशावर उलटली तर हे अंधभक्त बिळातच लपतील. हिंदूंचे मात्र नाहक बळी जातील. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Team Global News Marathi: