तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते; राणेंचा पवारांना टोला

 

राष्ट्रावादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी शक्ती कायदा कधी अस्तित्वात येणार? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. त्यावर आता प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाकचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. शक्ती कायदा अमलात आला असता तर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये गेले असते असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

शक्ती कायद्यावर कोणीच बोलत नसल्याचा आरोप आमदार रोहीत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना हा कायदा महाविकास आघाडीच्या सरकारच्यावेळी आला असता तर त्यांच्या सरकारमधले दोन ते तीन मंत्री जेलमध्ये गेले असते. अगदी आदित्य ठाकरे देखील आत गेले असते अशी टिका नितेश राणे यांनी केली आहे. रोहीत पवारांनी या कायद्याविषयी आधी समजुन घ्यावं. अमेझॉनच्या अलेक्सासारखं त्यांनी बोलू नये.

आपण पहिल्यांदाच आमदार झाला आहात. पवार साहेबांकडुन काहीतरी शिखावं. पवारसाहेब कसं मोजकच बोलतात आणि करायचं ते करुन टाकतात. हा वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय, जो सगळीकडे तोंड घालतो असा खोचक टोलादेखील नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. आता या टीकेला रोहित पवार नितेश राणेंना काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे

Team Global News Marathi: