ताज महालची जागा आमची, जागेचे कागदपत्र असल्याचा भाजपच्या महिला खासदाराने केला दावा

नवी दिल्ली | ताजमहालवरून वाद सुरूच आहे. ताजमहालच्या २२ बंद खोल्या उघडण्यात याव्यात, अशी मागणी हिंदू संघटना करत आहेत, यातून ताजमहालचे सत्य समोर येईल. भाजप खासदार दिया कुमारी यांनी दावा केला आहे की, ताजमहाल ज्या ठिकाणी बांधला आहे तो पूर्वी जयपूरच्या राजघराण्याचा महाल होता. शहाजहानने तो ताब्यात घेतला.

ताजमहाल वादावर भाजप खासदार दिया कुमारी म्हणाल्या की, आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांनुसार त्या जमिनीवर एक राजवाडा होता आणि शाहजहानने त्यावर कब्जा केला होता कारण तो त्यावेळी राज्य करत होता. ही जमीन जयपूरच्या राजघराण्याची होती आणि ती आमच्या मालकीची असल्याचे कागदपत्रे आमच्याकडे आहेत.

भाजप खासदार दिया कुमारी पुढे म्हणाल्या की, न्यायालयाने निर्देश दिल्यास आम्ही कागदपत्रे देऊ.’ दिया कुमारी यांनी ताजमहालच्या बंद खोल्या उघडण्याच्या मागणीचे समर्थन केले आणि सांगितले की, सध्याचे स्मारक बांधण्यापूर्वी तिथे काय होते याची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात जयपूर कुटुंबाकडे रेकॉर्ड उपलब्ध असून, गरज पडल्यास ती उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.

तसेच ताजमहालच्या बंद खोल्या उघडण्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा संदर्भ देत दिया कुमारी म्हणाल्या, ‘कोणीतरी आवाज उठवत याचिका दाखल केली हे चांगले आहे. त्यासाठी काही कागदपत्रे हवी असतील, तर ट्रस्टमध्ये आमच्याकडे पोथीखानाही आहे आणि जी काही कागदपत्रे असतील, न्यायालयाने आदेश दिल्यास. ती आम्ही पुरवू.

Team Global News Marathi: