केंद्र सरकारच्या कांदा आयातीच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्षेप.. म्हणाले कांदा आयात करून…
देशात आणि राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडताना दिसत आहे. कांद्याच्या या दारावर नियंत्रण आणण्यासाठी खाजगी व्यापारी वर्गाकडून कांदा आणि बटाट्याची आयात करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी यांनी केंद्राच्या या निर्णयावर आक्षेप घेत टोला लागवलेला आहे.
“शेतकऱ्यांना बाजार समितीच्या जोखंडातून मुक्त करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख टन कांदा आणि १० लाख टन बटाटा आयात करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्याचे उप्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने मोठी झेप घेतली आहे,” अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
कांद्याच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांद्याची आयात करण्यात आली असून दिवाळीपूर्वी आणखी २५ हजार टन कांदा येणार आहे, असे ग्राहक व्यवहारमंत्री पीयूष गोयल यांनी काल (३० ऑक्टोबर) सांगितले होते.
आनंद वार्ता: येत्या डिसेंबर-जानेवारीत येऊ शकते कोरोनाची लस, आदर पुनावाला यांची माहिती
नाफेडही आयात सुरू करणार असल्याने बाजारपेठेत पुरेसा पुरवठा उपलब्ध होईल, केवळ कांदाच नव्हे तर १० लाख टन बटाटाही आयात करण्यात येत असून त्यासाठी जानेवारी २०२१ पर्यंत सीमाशुल्क दहा टक्के करण्यात आले आहे, येत्या काही दिवसांमध्ये ३० हजार टन बटाटा भूतानमधून येणार आहे, असे गोयल यांनी सांगितले होते.