सुषमा अंधारेंवर टीका करतच राणेंनी आदित्य ठाकरेंना दिली धमकी

 

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामध्ये धडकली. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनी राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या सोबत आता राहिलंय कोण? सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांना माझ्या विरोधात बोलायला इथे आणलं. तिथेच शिवसेना संपली, असा घणाघात राणे यांनी केला. त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही इशारा दिला.

सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात आदित्य सुटणार नाही, कारण त्या प्रकरणातले सगळे वास्तव आम्हाला माहिती आहे, अशी धमकीच राणेंनी आदित्य ठाकरेंना दिली. शिवसेनेचे दुसरं पिल्लू आहे ते कुठल्याही बिळात शिरतंय. बिहारला जातो काय? कोणालाही मिठी मारतो काय…. त्याने कितीही मिठ्या मारल्या तरी सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात तो सुटणार नाही. कारण आम्हाला वास्तव माहिती आहे. आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा राणे आदित्य ठाकरेंना दिला आहे.

तसेच राणे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर सडकून टीका केली.काँग्रेस इतक्या वर्ष सत्तेत होतं.. काय केलं काँग्रेसने? आतापर्यंत किती भारत जोडला काँग्रेसने? एवढी यात्रा संपली की ते जातील इटलीला.. अशा शब्दात राणेंनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता राणेंनी केलेल्या टीकेला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: