मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. यातच आता महाविकास आघाडीकडून नवे शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार, याबाबत भाकित वर्तवत तारखा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-भाजप सरकार कोसळण्यासंदर्भात दावा केला होता. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकेल, असे भाकित वर्तवले आहे. बोदवड येथे आयोजित संवाद यात्रेवेळी अमोल मिटकरी बोलत होते.
यावेळी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर ५० खोके आणि एकदम ओके असे म्हटले तर एवढे का लागले? लहान मुलेही आता ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. त्या खोक्यांमध्ये बिस्किट, इंजेक्शन असू शकतात. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता बैलांवर ५० खोके, एकदम ओके लिहिले, असा टोला मिटकरी यांनी यावेळी लगावला.
“सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. यातच आता महाविकास आघाडीकडून नवे शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार, याबाबत भाकित वर्तवत तारखा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-भाजप सरकार कोसळण्यासंदर्भात दावा केला होता. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकेल, असे भाकित वर्तवले आहे. बोदवड येथे आयोजित संवाद यात्रेवेळी अमोल मिटकरी बोलत होते.
यावेळी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर ५० खोके आणि एकदम ओके असे म्हटले तर एवढे का लागले? लहान मुलेही आता ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. त्या खोक्यांमध्ये बिस्किट, इंजेक्शन असू शकतात. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता बैलांवर ५० खोके, एकदम ओके लिहिले, असा टोला मिटकरी यांनी यावेळी लगावला.