….तरीही महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं

 

मुंबई सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवलेले असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात लोकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे वारंवार सांगावे लागत आहे. पंतप्रधान बोलत आहेत. तरीही महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं अशा शब्दात शविसेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

उत्तराखंड-उत्तर प्रदेशमधल्या कावड यात्रेला दिलेल्या परवानगीच्या मुद्द्यावरून बोलताना सामनात भाष्य करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही ‘कावड यात्रेला योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला झापले आहे. कावड यात्रा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे हे मान्य, पण कुंभमेळ्यापासून कावड यात्रेपर्यंत गर्दीचा पूर येतो, त्या पुरात शेवटी भक्तांचीच प्रेते वाहताना दिसतात. उत्तराखंड सरकारने कोरोना काळात कावड यात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला.

दोन्ही भाजपशासित राज्ये असून दोघांच्या दोन तरहा दिसत आहेत. पण उत्तर प्रदेशातील कावड यात्रेची दखल घेऊन शेवटी सुप्रीम कोटनि हस्तक्षेप केला हे महत्त्वाचे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकणार आहेत काय? पंढरपूरच्या वारीस परवानगी द्या, असे एक टुमणे ते लावत आहेत व वारकरी संप्रदायातील काही जाणत्या मंडळींना भरीस घालून ‘वारी’साठी आंदोलने घडवीत आहेत.लोकांच्या जिवाशी खेळण्याचेच हे अघोरी प्रकार आहेत अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आलेली आहे.

Team Global News Marathi: