राज्यातील निर्बंध ३१ जानेवारी पर्यंत लागू, ठाकरे सरकारचा निर्णय
ग्लोबल न्यूज: एकीकडे कोरोनाचे संकट निवळत असताना दुसरीकडे ब्रिटनहून आलेल्या नव्या कोरोनाच्या विषाणूमुळे संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढली आहे. त्यात परदेशी प्रवास करून आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यामुळे राज्य सरकार संपूर्ण खबरदारी घेत आहे.
खबरदारी कोरोनाचे संकट महाराष्ट्रातही पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. यामुळेच ठाकरे सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील, असे जाहीर केले आहे.
मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध राज्य सरकारने शिथील केले असले, तरी अद्याप काही गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबई लोकलचाही यामध्ये समावेश आहे. लवकरच मुंबई लोकल सुरु होईल, असे सांगितले जात असले तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच राज्य सरकारने आता राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट केले आहे.
तसा अद्यादेश राज्य सरकारकडून प्रसिद्द करण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये राज्य सरकार कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे.