संजय राऊत यांच्या टीकेला प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी दिले प्रतिउउतर !

 

मुंबई | स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातुन जोरदार टोला लगावला होता. आता सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी जो अग्रलेख लिहिला आहे. त्या अग्रलेखातून त्यांनी माझ्या मनातील भावना मांडलेल्या आहेत. राऊत यांनी ,माझ्या मनातील बरोबर ओळखले आहे. आणि तेच प्रत्यक्षात अग्रलेखातून मांडले आहे. राऊत यांनी स्वबळावरून जे म्हंटले आहे. त्याला माझे असे मत आहे कि, स्वबळाबाबत पक्षनेतृत्व निर्णय घेईल. २०२४ मध्ये नंबर वन पक्ष होईल.

तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सध्या सर्वत्र देशासह राज्यत अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले आहे. या विरोधात काँग्रेस लढाईही लढत आहे. अशा परिस्थितीत विरोधक मात्र सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत अशी टीका पटोले यांनी भाजपावर केली होती.

Team Global News Marathi: