नागपूर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून आले होते अशातच आता पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर पण एकदा निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की,’आपण केलेल्या वक्तव्याबद्दल बंड्यातात्या कराडकरांनी माफी मागितल्यानंतर देखील त्यांच्या विरोधात अद्यापही आंदोलन सुरूच आहे. खरं तर घोटाळे, भ्रष्टाचार, ईडीची कारवाई, वाईनच्या विक्रीला किराणा दुकानातून विक्री करण्यास दिलेली परवानगी याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे याकरिता हा खटाटोप सुरू असून सत्तेवरून खेचून काढत नाही तोपर्यंत सत्ता भोगायची हे या सरकारचे धोरण आहे’, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, आम्ही आहोत म्हणून सरकार ताळ्यावर आहे. तसेच किरीट सोमय्या जे बोलतात तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असतात. सुजित पाटकरच्या कंपनीत संजय राऊत आणि त्यांच्या मुलीची भागीदारी आहे,अशा बातम्या सध्या समोर येत आहेत. मी एवढेच म्हणेन की किरीट सोमय्या यांच्याकडे आणखी बरेच काही आहे’, असेही पाटील यावेळी म्हणाले.