राज्यात आणि देशात काॅंग्रेस हाच सक्षम पर्याय – नाना पटोले

 

नगर | मागच्या काही दिवसांपासून विविध राज्यांमधील गोंधळांमुळे काॅंग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावरून काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधक आणि पक्षातील मंत्र्यांना चांगलेच सुनावलं. अशातच आता काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काॅंग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भाजपसारख्या पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने सबका साथ देणारा पक्ष असल्यानेच काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचं काम काॅंग्रेसमध्ये केलं जातं. सर्वांच्या विकासासाठी झटणारा काॅंग्रेस पक्ष हाच देशात व राज्यात सक्षम पर्याय आहे, असं नाना पटोले म्हणाले.

काॅंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. तेव्हा नगरमधील अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर निशाणा साधला. देशात मागील काही वर्षापासून धर्माच्या नावावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केलं जातं आहे. लोकशाहीला संपवण्याचे कटकारस्थान रचलं जात आहे. परंतु, भारत हा लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे असा विधान मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते.

 

Team Global News Marathi: