राज्यातील प्राचीन वृक्षांच्या संरक्षणासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा पुढाकार |

 

मुंबई | मुंबईत होत असलेल्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्राचीन वृक्षांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला असून यासाठी आवश्यक त्या सुधारणा करत विधेयक विधिमंडळ पटलावर मांडण्यात आलं. या विधेयकात आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्याकरिता तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना देखील करण्यात आली आहे.

महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन विधेयक, २०२१ हे विधेयक एकमताने सभागृहात मंजूर करण्यात आलं. सुधरणा विधेयक प्रस्ताव ठेवल्यानंतर पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी या विधेयकातील तपशील समोर मांडला. तसेच हा बदल करणं का आवश्यक आहे?,हे सभरूपातील सर्व सदस्यांना पटवून दिले.

“विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होते. शास्वत विकास याकडे कुणीही लक्ष देत नाही. वातावरणातील बदल का होतात?, याकडे आपण दुर्लक्ष करतो. यासाठी पाच मुद्दे समोर आणले आहेत. पहिलं म्हणजे प्राचीन वृक्ष, विकासासाठी आपण जी झाडं कापत असतो. ती झाडं १५० ते २०० वर्षे जुनी असतात. मागच्या वर्षी आम्ही नॅशनल हायवे अॅथोरिटीकडे निवेदन करून सांगलीतील ४०० वर्षे जुनं झाड वाचवलं. रस्ता त्याच्या बाजूने नेला. या गोष्टी शक्य आहेत. या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करणं गरजेचं आहे.” असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधेयक मांडताना सांगितलं.

Team Global News Marathi: