मुंबई | परिवहन मंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यातच हे आंदोलन अधिक चिघळताना दिसून येत आहे. यातच आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष सुद्धा या आंदोलनात उतरली आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला होता मात्र तत्पूर्वी त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई मंत्रालय येथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्रातून अनेक एसटी कर्मचारी दाखल झाले आहे. परंतु मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मानखुर्द चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे.
याचाच निषेध व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, ही आता आर या पारची लढाई आहे अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी राज्यभरातून एसटी कर्मचारी मुंबईत दाखल एसटीचे ३७६ कर्मचारी निलंबित राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत ३७६ संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे.