एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ही घोषणा

 

मुंबई | ज्यात एसटीचा संप बेमुदत सुरू असून या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. एसटीचे काही कर्मचारी उदरनिर्वाहासाठी वेठबिगारी म्हणून काम करतोय. ट्रक चालवतोय. एसटी बंद असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. आता परिक्षा सुरू होत असून विद्यार्थी परिक्षा केंद्रापर्यंत कसे पोहचणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

पुढे बोलताना शेलार म्हणाले की, न्यायालयात तारखांवर तारखा पडत आहेत. सरकार काही तोडगा काढत नाही. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘तुम्हाला कामावरुन कमी करू, दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी भरु, अशी धमकी सरकार देत आहेत असा आरोप करत या विषयावर चर्चा घडवून आणावी अशी मागणी त्यांनी केली.

अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारल्याने भाजपा आमदार आक्रमक होऊन त्यांनी वेलमध्ये धाव घेतली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी सरकारच्यावतीने उत्तर देताना हे अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार याबाबत आपली भूमिका स्पष्‍ट करेल असे जाहीर केले. त्यामुळे एसटी बाबत लवकरच राज सरकार महत्वपूणर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे परब यांच्या वक्तव्यातून दिसून येते.

Team Global News Marathi: