‘.म्हणून मोदी चहामध्ये साखर देखील घेत नाहीत’ ओवेसी यांनी साधला निशाणा

 

जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर दहशतवादी संघटनेकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरातुन संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. त्यातच मोदी सरकारवर सुद्धा घणाघाती टीका विरोधकांनी केली आहे. अशातच आता MIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर बोलायला नेहमीच घाबरतात, त्यामुळे चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून मोदी चहामध्ये साखरही टाकत नाही, अशी खोचक टीका औवैसींने केली आहे. यावेळी बोलताना, मोदी कधीच दोन गोष्टींवर बोलत नाहीत त्या म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि चिनी सैन्याची भारतात घुसखोरी, असं देखील औवैसी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, बोलताना आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या मात्र मोदी म्हणातात ‘मित्रों फिकर मत करो’, असा टोला असदुद्दीन औवैसी यांनी लगावला आहे. तसेच पाकिस्तानने पुलवामावर हल्ला केल्यानंतर त्यांना घरात घुसून मारणार, असं मोदी म्हणााले होते, मात्र त्यांनी काहीच केलं नाही याची आठवण देखील औवैसींनी करुन दिली आहे.

Team Global News Marathi: