समृद्धी महामार्गामुळं शेतकरी आत्महत्या करणार नाही : एकनाथ शिंदे

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्ग गेम चेंजर असल्याचं म्हटलं आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. ही फडणवीसांची योजना होती. त्यांनी मला जबाबदारी दिली, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय . या महामार्गामुळं लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील ‘संकल्प से सिद्धी’ परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, शपथविधी होताच आम्ही काम सुरु केलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक झाली, इन्डस्ट्रीअल काॅरिडोर संबंधात चर्चा झाली. हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं सरकार आहे, मोदींनी आशीर्वाद दिलाय, गृहमंत्री शाह, नितीन गडकरी तर आपलेच आहेत. यात फडणवीसांचे मोठे योगदान आहे.

तसेच आमची चांगली दोस्ती आहे. गडकरींची ओळख आपल्याला माहिती आहे, देशातला पहिला सुपर एक्सप्रेस त्यांनी बनवला. एक्सप्रेस-वे मुळे आपण मुंबई-पुणे अडीच तासांवर आणलं. या मार्गावर आता मी एक टनेल बनवत आहे, लवकरच तो पूर्ण होईल, 20-25 मिनिटं आधी आपण पोहोचू, असंही शिंदे म्हणाले.

Team Global News Marathi: